आभाळ फाटलं ही कविता
आभाळ फाटलं.
ढग दाटुन येता भाभाळ फाटलं , बळीराजाच
हृदय अश्रुनं दाटल ।
त्यानं आपलं बस्तान शेतामधी थाटलं , मुक्या
जीवांना सुद्धाकी रे थंडीनं गाठलं ।
मोत्यावानी पीक उभ्या थेंबात वाकलं , सुर्यदेवानं मुख ढगाआड झाकल ।
रूप पिकाचं माझ्या धुक्यानं माखलं , म्हणे
बळीराजा माझं कुठ चुकलं , माझं कुठ चुकलं ।
कसं आभाळ फाटलं , कर्म आभाळ फाटलं //
दिमा मागं दिस येता , अदकृपेने बांधलं , द्रिष्ट
लागली शेता माझ्या मनी विचाराची धांदल /
काय कल , कस कल , मला कोण सांगाल , कम
आभाळ फाटलं , कसं भाभाळ फाटलं ।।
दिम माटा , रात माटी हात चिखलामंदी माखलं ,
पाय बांधा मंदी कतलं /
तेल घालुनिया डोळ्यामंदी , पीक हातदिन राखलं ,
खत पाणी घालुनिया पीक जोमात जपलं ।
येता पावसाच्या सरी पीक सारं मातीआड लपलं ,
मातीआड लपलं /
कसं आभाळ फाटलं , कसं आभाळ फाटलं //
बनविला देह माझा निश्चयाचा महामेरू , उरी
बांधलिया स्वपना आता कुठे मी पेरू ।
चंद्र माड्या भाग्याचा कुठे - कुठे मी हेरू .
घाम मोत्याचा घरट्यात कमा मी भरू ।
धीर मना देवुनिया देवी माते साकडं मी घातलं , ठेव
सुखी बळीराजा , घाल टाका आभाळा /
घाल टाका आभाळा , कसं आभाळ फाटलं ,
कसं आभाळ फाटलं //
Comments
Post a Comment